श्री नवनाथ भक्तिसार
अध्याय :- ८ (मराठी भाषांतर )
॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ||श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो
मच्छिंद्रनाथ वज़ेश्वरी सोडून पुढे उत्तरेकडे गेले. द्वारकेला जाऊन त्यांनी गोमती नदीत स्नान केले. नंतर ते शरयू नदीतीरी अयोध्या नगरीला गेले. तेथे रामवंशातील पाशुपत नावाचा राजा होता, तो रामाच्या देवालयात पूजेसाठी गेला होता. त्याच्याबरोबर फार मोठे सैन्य होते. देवालयातही अपरंपार गर्दी होती. मच्छिंद्रनाथही त्याच वेळी दर्शनासाठी देवालयात शिरत होते. तेव्हा तेथील द्वारपालांनी त्याला अडविले व म्हटले, “ए मुर्खा! कानफाट्या, मागे हो, चाललास कुठे? राजेसाहेब दर्शनाला आले आहेत. दिसत नाही का? मागे हट.'' असे ओरडून मच्छिंद्राला त्यांनी मागे ढकलून दिले . मच्छिंद्रनाथाने राग आवरला. चाकरांवर क्रोध करणे योग्य नव्हे; ते बिचारे धन्याच्या स्वाधीन. बरे, राजाला शिक्षा करावी तर तो लाखांचा पोशिंदा, त्याची हानी म्हणजे सर्व प्रजेची हानी. म्हणून राजालाही कठोर शिक्षा करून चालणार नाही, असा विचार करून मच्छिंद्रनाथ मंदिराबाहेरच्या गर्दीत थांबले.
देवालयात राजा राममुतींसमोर साष्टांग नमस्कार घालीत होता. मच्छिंद्राने गुप्तपणे भस्मावर स्पर्शास्त्र मंत्रून त्याच्या दिशेने ते टाकले. राजावर त्याचा असा प्रभाव पडला की तो दंडवत घांलून जो पडला होता, तो भूमीला चिकटूनच राहिला. रामाच्या मुर्तीसमोर राजा पडलेला; त्याला उठताच
येईना. सगळे लोक पहात राहिले. सर्वच गोंधळ झाला. कोणातरी योग्याचा अपमान झाला असणार, म्हणूनच राजाची अशी अवस्था झाली, असे सर्व बोलू लागले व सर्वत्र शोध घेऊ लागले. द्वारपालांकडून मच्छिंद्रनाथाचा शोध लागला. मग मंत्री येऊन त्याच्या पायां पडले व काकुळतीला येऊन त्याला विनवू लागले. त्यांची दया येऊन मग नाथाने विभक्त मंत्र जपून राजाला सोडविले. राजा उठला. तोही नाथाला शरण आला.
मच्छिंद्रनाथाचे नाव कळताच तो आनंदाने गहिवरला. त्याने आधीच मच्छिंद्रनाथाची कीर्ती ऐकली होती. तेव्हा प्रत्यक्ष दर्शन झाल्यामुळे त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
त्याने मोठ्या सन्मानाने मच्छिंद्रनाथाला राजवाड्यात नेले आणि त्यांचा मोठा सत्कार केला.
राजाने मच्छिंद्रनाथाची सेवा इतकी मनोभावे केली की, त्याच्या वर मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाला. तो म्हणाला, “राजा, तुझी काय इच्छा आहे ती सांग, मी पुर्ण करीन. तेव्हा राजा हात जोडून म्हणाला, “महाराज, मी रामचंद्राच्या वंशातला आहे. मलां त्यांचे दर्शन होईल तर मी स्वत:ला फार धन्य समजेन." मच्छिंद्रनाथाने राजाचे म्हणणे मान्य करून राजाला सभागृहाच्या बाहेर मोकळ्या पटांगणात नेऊन आपले अमोघ अस्त्र म्हणजे
वाताकर्षण अस्त्र काढले. भस्माची चिमूट मंत्र म्हणून त्याने सूर्यावर फेकली. त्यामुळे रथाचा आधार असे जे वायुचक्र ते आकृष्ट झाले व सूर्याचा रथ पृथ्वीवर उतरला. त्याचे तेज इतके दाहक झाले की पृथ्वीवर सगळीकडे अय्नी भडकला व सृष्टी जळू लागली. ते पाहून मच्छिंद्रनाथाने जलदास्त्राचा प्रयोग करून तो भयंकर अग्नी शांत केला. सूर्य मात्र वाताकर्षण अस्त्रामुळे अश्व-अरूणांसह निशचेष्ट पडला होता. त्यामुळे स्वर्गातील सर्व देवांचे तेजही क्षीण झाले व त्यांचे मुख्य ब्रह्मा, विष्णू व शंकर हे पृथ्वीवर आले. मच्छिंद्र सर्वांचा आवडता होता; पण त्याने सूर्याची अशी वाईट स्थिती केल्यामुळे ते दु:खी झाले. त्यातले भगवान विष्णू मच्छिंद्रालां म्हणाले, “मच्छिंद्रा! या जगमित्र सूर्यावर तू अन्यायाने हे अस्त्र का उपयोगात आणलेस?'' मच्छिंद्रनाथाने उत्तर दिले, “हा पाशुपतराजा सूर्य वंशातला आहे. सूर्याने कधीतरी या. आपल्या वंशजाची साधी इच्छा तरी पुर्ण केली आहे का?''
विष्णू म्हणाला, “मग तुझी काय इच्छा आहे?'' मच्छिंद्रनाथ म्हणाला, *पाशुपत राजाला सूर्याने नित्य सहाय्य केले पाहिजे करण्याची त्याची इच्छा आहे, ती सूर्याने पूर्ण केली पाहिजे आणि माझ्या शाबरी विद्येत आपण स्वत: नाममंत्राच्या ठायी न चिच्या
पाहिजे?” विष्णू म्हणाले, “तुझे हे काम करण्याचे सूर्य मान्य करील. तू त्याला आधी सावध कर." मच्छिंद्रनाथ म्हणाला, '“कृपाकरून आधी
या राजाला रामप्रभूंचे दर्शन घडवा. मगच सूर्याला सोडीन,'' त्यांचे हे बोलणे झाले न झाले तोच स्वत: रामचंद्र व लक्ष्मण प्रगट झाले. त्यांचे दर्शन होताच शंकरांना अत्यंत आनंद वाटला. पाशुपतराजाला खूप आनंद झाला आणि मच्छिंद्रनाथाने रामचरणी मस्तक ठेवले; तोच रामाने त्याला उठवून आलिंगंन दिले. मच्छिंद्रनाथ रामाला म्हणाला, “रामचंद्र, तुझे नाम सर्व नामांत श्रेष्ठ आहे, तुला माझी अशी विनंती आहे की, मी रचलेल्या शाबरी
विद्येतील मंत्रांना नेहमी तुझे सहाय्य मिळावे आणि जर तशी इच्छा नसली, तर कोदंड सज्ज करावे व माझ्याशी युध्दाला यावे.'"
त्याचे चीरश्रीयुक्त बोलणे ऐकून रामाला कौतुकच वाटले. तो म्हणाला, “मच्छिंद्रा, तिन्ही देवांची एकत्र झालेली शक्ती म्हणजेच दत्तात्रेय. त्यांनी तुला सर्व विद्या दिल्या आहेत. सर्व देव तुझ्या मंत्रांचे सहाय्यकर्ते आहेत, मग मी तरी वेगळा का राहीन? तुझ्या मंत्रात माझे नाव येईल तिथे मी सर्व शक्तींसह सहाय्याला येईल. तू कवि म्हणजे विष्णूचाच अवतार व मीही विष्णूंचाच अवतार, तुझे व माझे ऐक्यच आहे, नव्हे का? तू धन्य आहेस, माझ्याच वंशजाला माझे दर्शन घडविलेस. आता हा सर्व सृष्टीचा प्राण असा सूर्य मात्र तू अजून व्यर्थ बांधून ठेवला आहेस. त्याला पुन्हा सावध कर.” हे ऐकून मच्छिंद्र व सर्व देवही संतोष पावले. नाथाने लगेच वाताकर्षण मंत्र आवरून घेतला. सूर्याची बंधनातून सुटका झाली. तो इकडे तिकडे पाहू लागला, तेव्हा सर्व देव जमलेले त्याला दिसले. आपल्याला कोणत्या योगी बीरपुरूषाने बध्द केले, ते पाहण्याची इच्छा सूर्याने प्रकट केली. देवांनी मच्छिंद्राला सांगितले, सूर्यदेंब तुम्हांला दर्शनाला बोलावीत आहेत.'' मच्छिंद्रनाथ निघाला, पण सूर्याच्या दाहकतेविरूध्द उपाय म्हणून त्याने चंद्रारत्राचा जप करून मागे व पुढे असे दोन शीतल चंद्र उप्तन्न केले. पर्जन्यारत्राने सतत थंड पाणी अंगावर पडत राहिल अशी योजना केली व नंतर सूर्याचे दर्शन घेतले. विष्णूजवळ सूर्याने मच्छिद्रनाथाची चौकशी केली. तो कविनारायण असून कलियुगात ईश्वरी कार्य करीत आहे असे कळाले, तेव्हा सूर्याने त्याला वरदान देऊन, शाबरी विद्येला सहाय्य करीन असे आश्वासन दिले. त्यानंतर अरूणाने सप्त अश्वांना गती
दिली व सूर्य गगनमार्गाने प्रवास करू लागला. सर्व देव, रामचंद्र व लक्ष्मण हेही स्वस्थानी गेले. राजासह मच्छिंद्रनाथ राममंदिरात गेला. तेथे यथासांग पूजा करून व पाशुपताचा निरोप घेऊन तो अयोध्येतून पुढे वंगदेशात गेला.
अध्याय फलश्रुती:-
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.