Subscribe Us

श्री नवनाथ भक्तिसार अध्याय :- १० (मराठी भाषांतर )

श्री नवनाथ भक्तिसार   

अध्याय:-१० 

     ( स्त्री -दोष नाहीसे होतील.मन सात्विक होईल.मुले जगतील. )
 
               ॥ श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरूभ्यो नम: ||श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो.

 


                         मच्छिंद्रनाथानें गोरक्षाला सर्व विद्या दिल्या त्याला ब्रम्हज्ञान दिले.रसशास्त्र, काव्य ,वेद ,शास्त्र ,ज्योतिष्य, व्याकरण ,धनुर्वेद, जलतरण ,संगीत ,अश्वारोहण ,नाट्य, शृंगार इत्यादी सर्व विद्या शिकवल्या नाना अस्त्रे देवतांची उपासना शिकवली सर्व देवता अनुकूल करून दिल्याअष्ट सिध्दी दिल्या आणि त्याला आपल्यासारखाच जाणता केला. < पुढे एकदा काय झाले. गोरक्षनाथ एकटाच त्याचा पाठ म्हणत होता. मच्छिंद्रनाथ कोठेतरी गेला होता. गावाच्या बाहेरची एकान्तातील मोकळी जागा होती. तेव्हा गावातली काही मुले तिथे खेळत खेळत आली. त्यांनी गोरक्षाला पाहिले. ती त्यांच्याजबळ आली. त्यांना मातीची बैलगाडी करून हवी होती. मुले त्याला विचारू लागली, “अरे मुला, तुला मातीची बैलगाडी करता येते का? दे ना आम्हाला करून'' तो म्हणाला, '' मला नाही येत. तुम्हीच तुमची खेळणी करा नि खेळा. मला अभ्यास आहे.


'' मग मुलांनी प्रयत्न करून गाडी बनविली. जराशी ओबड धोबडच झाली होती. मग त्यांना वाटले, या गाडीवर गाडीबान नाही. गाडीवान पण तयार करावा. त्यांनी प्रयत्न केला, पण गाडीवानाचा पुतळा मात्र त्यांना तयार करता येईना. ती मुले पुन्हा गोरक्षाकडे आली व म्हणाली, “आम्हाला निदान माणसाचा पुतळा तयार करून दे. '' त्यावेळी गोरक्ष संजीवंनी मंत्राचा पाठ म्हणत होता. त्याने मुलांना म्हटले, “बरे तर आणा माती." त्याने मग ओली चिकण माती घेतली आणि एक लहानसा मनुष्याकृती पुतळा बनविला. एकीकडे संजीवनी मंत्र तो म्हणतच होता. त्याचा परिणाम असा झाला की, त्या पुतळ्यातील चिखल नाहीसा होऊन तिथे खरोखरीचा बालक निर्माण झाला आणि तो मोठमोठ्याने रडू लागला.


                   त्याची ही अद्भूत करणी पाहून मुले घाबरली व “भूत! भूत!'' असे ओरडत पळत सुटली. त्यांना मच्छिंद्र वाटेतच भेटला. मुलांनी सर्व वृत्तांत मच्छिंद्राला सांगितला, तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, “भिऊ नका! चला, मला दाखवा. मी पहातो त्या भुताला. चांगली शिक्षा करतो त्याला. '' मुले म्हणाली तुम्ही जाऊ नका तिकडे तुम्हाला पण भुतं खाईल पण त्याने तुम्हाला तुम्ही मला जवळ नका दुरूनच दाखवा अशी त्यांची समजूत काढली. तेव्हा ती मुले मच्छिंद्राला घेऊन तिथे गेली व त्यांनी दुरूनच रडणारे बालक त्याला दाखविले. तेथे गोरक्ष सुद्धा नव्हता. बालकाचे रडणे ऐकून तो सुद्धा भिऊन दूर लपून बसला होता. संजीवनी मंत्राचा हा प्रभाव होता, पण ते त्याला काही समजले नव्हते. मच्छिंद्राने त्या मुलाला पहिले तेव्हा लगेच त्याला ओळखले .हा करभाजनऋषीच आहे.मच्छिंद्र लगेच पुढे गेला .वात्सल्याने त्याने त्या बालकाला वाळूवरून उचलले व जवळ घेतले. सर्व मुले भयभीत झाली ब ओरडत पळत सुटली, मच्छिंद्रही त्या मुलाला दोन्ही हातात धरून गोरक्ष कुठे आहे त्याचा शोध करीत निघाला. 


प्रत्येक घरी तो विचारीत सुटला, “गोरक्ष आहे का?” मुले भिऊन पळत होतीच. घरोघरच्या बाया “अग बाई ! हा कोण गोसावी?" म्हणून भिऊन पळत सुटल्या. मग घरोघरचे पुरुष पुढे झाले व विचारू लागले. “काय रे, मुलांना का भीती दाखवतोस? हे कुणाचे मुल घेऊन हिंडतोस? पळवून आणलेस की काय?" तो प्रत्येकाला सांगू लागला, गोरक्षनाथ म्हणून माझा एक तरुण शिष्य आहे. तो कुठे सापडत नाही. तो सापडला की मग सांगतो काय प्रकार आहे तो.” मच्छिंद्राची हाक ऐकून एका ठिकाणाहून गोरक्ष बाहेर आला, पण मच्छिंद्राच्या हातात बालक पाहून तो पुन्हा पळाला. या मुलाचीच गोरक्षाला भिती वाटते. याला खाली ठेवावे, असा विचार करून मच्छिंद्राने त्या मुलाला एका जागी वस्त्रावर ठेवले आणि गोरक्षाला भेटून सर्व काही त्याला विचारले. मग गोरक्षाने झालेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, अरे, संजीवनी मंत्राने त्या मातीच्या पुतळ्यात प्राण आले आणि करभाजन क्रषी स्वत: जन्म घेऊन आले. तू ओळखले नाहीस का? याचे नाब गहिनीनाथ ठेवायचे. चल आपण त्या मुलाचे पालनपोषण करू-''

                           

मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाचे पालनपोषण करू लागला. गावातल्या लोकांनी मच्छिंद्रनाथाच्या योगबलाची फारच प्रशंसा केली. त्या मुलाची
संजीवनी मंत्राने उत्पत्ती पाहून स्त्रियांच्या मनात आले, हा बालक वाढविणे हे काम काही या योग्याकडून होणार नाही. कोणी'तरी स्त्रीच हे काम करू शकेल. त्यांना एकदम आठवले. गावात मधू नावाचा एक ब्राह्मण आहे. त्याची पत्नी गंगाबाई ही चांगली दयाळू स्त्री आहे. त्या दोघांना मुलबाळ नाही. हा मुलगा तिच्या ओटीत घालावा. सर्वांनी मच्छिद्रनाथाला तसे सांगितले. मच्छिंद्रनाथाने त्या जोडप्याला बोलावून आणले. नंतर तो म्हणाला, “माई, हा मुलगा म्हणजे नवनारायणातील करभाजन क्रषीच आहे. याचे संगोपन नीट कर. तुझा पुत्र म्हणून हा विख्यात होईल. तुला एक सांगतो, आजपासून बारा वर्षांनी गोरक्ष येथे येईल आणि या मुलाला योगदीक्षा देईल. त्यावेळी तू हा पुत्र जगाच्या कार्यासाठी परत दे.'' ती स्त्री लगेच म्हणाली, “स्वामी, तुम्ही मला हा माझा पुत्र म्हणून द्या. तुम्ही तरी बारा वर्षांनंतर एवढी ममता व आशा या मुलाविषयी का ठेवावी? तुम्ही तर जोगी!'' तेव्हा मात्र मच्छिंद्र म्हणाला, “तसेच होवो! माऊली, गहिनी हा तुझाच मुलगा म्हणून जग ओळखील, पण एवढे मांत्र खरे की गोरक्ष बारा वर्षांनी येईल ब याला योगदीक्षा देईल.


'' सर्व गावकऱ्यांसमक्ष त्याने गहिनीला त्या स्त्रीच्या स्वाधीन केले, त्या स्त्रीने वात्सल्याने त्या मुलाचा स्वीकार केला. त्यानंतर काही दिवसांनी मच्छिंद्र गोरक्षाला घेऊन पुढील तीर्थयात्रेला निघाला. मच्छिंद्राने असे ठरविले की, गोरक्षाला बद्रिकाश्रमात ठेवावे. त्याने आधी बद्रिकाश्रमाकडे जाण्याचे ठरविले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या